कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या मंदिरांचा जणू खजिनाच. इथली मंदिरं आजही पुरातन अवशेषांच्या पाऊल खुणा जपत श्रद्धा आणि भक्तीची साक्ष देतात. इतकंच नाही तर लोकजीवनाचा सेतू म्हणून जनमानसात आपलं अढळ स्थान राखून आहेत. ‘मंदिर’ या संकल्पनेनं कोकणात जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रुजवला असून माणसांना उत्सवाच्या माध्यमातून जोडल्याने धार्मिक व सांस्कृतिक संचित निर्माण केलं आहे..
श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे
देवगड-नांदगांव मार्गावर देवगड एस.टी. स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावरील जामसंडे गावात 300 वर्षापूर्वीची श्री दिर्बादेवी आणि श्री रामेश्वर अशी दोन मंदिरे एकाच ठिकाणी अतिशय निसर्गरम्य शांत ठिकाणी आहेत. हे जामसंडे-देवगडचे ग्रामदैवत आहे. या ग्रामदेवतांसभोवती नारायण, आदिनाथ गणपती, पावणाई, मारूती, ब्राह्मणदेव हे मंदिर आहेत. मुख्य मंदिरात दिर्बादेवी विराजमान झालेली आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता आहे. पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारात देवगड बंदराला फार महत्वाचे स्थान आहे. श्रीलंका, ब्रह्मदेश या भागात मूर्तीचा व्यापार होत असे. बहुदा वादळात भरकटलेल्या जहाजावरील कुणा व्यापाराने जहाजावरील बोजा कमी करण्यासाठी किंवा मूर्ती भंजक यवनांपासून मूर्ती वाचविण्यासाठी समुद्रात दडवली असावी. ही मूर्ती गाबीत समाजातील खवळे-ढवळे मंडळींना देवगड-मिठमंबरी समुद्र परिसरात सापडली .नंतर त्यांना झालेल्या दृष्टांतावरून तिची जामसंडे येथील माळावर मंदिरात स्थापना झाली. यामुळे मच्छीमार बांधवांना ती आपली वाटते. मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. ती भटवाडीतील भिडे या माहेरवाशिणीने बांधली आहे. आवारात पाय-यांची विहीर आहे. चार दीपमाळा आहेत. वीरांची स्मारकंअर्थातच वीरगळही मंदिराच्या आवारात आहे.
श्री देवी दिर्बादेवीची मूर्ती सुषुम्ना स्वरातील असून कानात मकर कुंडलं, मागे प्रभावळ, उजव्या हातात खड्ग, डाव्या हातात अमृतपात्र अशा शस्त्रांनी, आभूषणांनी दिर्बादेवीची मूर्ती सुसज्ज आहे. मूर्ती नेहमीच जिवंत वाटते. मूर्ती जुन्या काळातील असून, ती दोन फूट उंचीची आहे. मूर्ती द्विभूज असून ती काळ्या पाषाणातून कोरलेली आहे. समस्त देवगड आणि जामसंडे गावाचं रक्षण करते, अशी तिथल्या भक्तांची श्रद्धा आहे.
मंदिराला उंच कळस बसवला आहे. आत मंदिरात जमीन आणि भिंतींवर फरशी, मार्बल टाइल्सचा सुरेख वापर करून केलेलं सुशोभीकरण पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे. मंदिराच्या आसपास पूर्वीपासून भग्नमूर्ती दृष्टीस पडतात.
मंदिराच्या पाठीमागे 700-800 वर्षांपूर्वीची विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीचे नाक ठेचलेले आहे. यावरून शैव व वैष्णव धार्मिक वादाची ही साक्ष आहे हे स्पष्ट होते. देव रामेश्वर हा शैवांचा व वैष्णवांचा देव विष्णु होता. मात्र रामेश्वराची पिंडी पूजतात म्हणून विष्णूची मूर्ती मागील बाजूला आहे. या मूर्तीवरचे विष्णूच्या दशावताराचे कोरीव काम अप्रतिम आहे. जिज्ञासूनी ते जरूरी पहावे. कोकणातील ब-याच देवस्थानात अशा मौल्यवान प्राचीन मूर्ती आहेत. कान्होजी आंग्रे यांनी दिर्बादेवीला प्रदान केलेली तोफ रामेश्वर मंदिरासमोंर आहे.
देवगडवासीयांचं आणि हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली दिर्बादेवी भक्तांच्या हाकेला, संकटाला, मदतीला उभी राहते, याचा प्रत्यय सर्वानाच आलेला आहे. कुठलंही मंगलकार्य असेल अथवा गावाबाहेर प्रवासाला जायचं असेल तर मंगलभावनेने प्रत्येक जामसंडेकर आणि देवगडकर या देवीसमोर भक्तिभावाने नतमस्तक होतो.
श्री देवी भद्रकाली, रेवंडी, ता. मालवण
श्री क्षेत्र स्वयंभू कालिकादेवी मंदिर... हडी, मालवण
कालिकादेवीची स्वयंभू पाषाणमूर्ती येथील एका शेतक-याला शेत नांगरताना सापडली. मूर्तीला नांगराचा फाळ लागल्याने त्यातून रक्त येत होते, अशी अख्यायिका आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर ती खूण अद्याप तशीच आहे. या देवीचे भक्त केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी आहेत. गोवा, कर्नाटक या शेजारच्या राज्यांतील भाविकही या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. त्रिपुरारी पौर्णिमेला देवीची यात्रा भरते. त्यादिवशी देशाच्या विविध भागांतून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येतात. देवीचे मंदिर पुरातन असून त्याची देखभाल व व्यवस्थापन हडी देवस्थान समितीच्या वतीने केले जाते. मंदिरात दरवर्षी भाविकांची गर्दी वाढतच असल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्याची विनंती काही भाविकांनी केली . त्यामुळे देवस्थान समितीने मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारले आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर...
स्वयंभू द्विभूज श्री गणेश, रेडी-वेंगुर्ला
श्री देव रामेश्वर, कांदळगाव
श्री भराडी देवी यात्रा, आंगणेवाडी
कोकणात प्रामुख्याने मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी या तीन जत्रा अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यातही गेल्या काही वर्षांत मुंबईतून आंगणेवाडीच्या जत्रेला जाणार्या चाकरमान्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पूर्वी जत्रेला येण्यासाठी एसटीच्या लाल डब्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोकण रेल्वेबरोबरच खाजगी वाहनांचीही साथ मिळू लागल्याने दरवर्षी आंगणेवाडीची जत्रा गर्दीचे विक्रम मोडत आहे. आंगणेवाडी ही खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे या गावाची एक वाडी. म्हणजे एका अर्थाने ही एका वाडीची जत्रा म्हणायला हवी, मात्र गेल्या पाच-पंचवीस वर्षांत तिला स्वरूप आलं आहे ते महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रासारखं. अडलेले नडलेले गोरगरीब मोठ्या श्रद्धेने जसे या जत्रेला जातात, तसंच खिशात चार पैसे खुळखुळू लागलेले हवशे-नवशे आंगणेवाडीची जत्रा नेमकी आहे तरी काय या उत्सुकतेपोटीही जातात.
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, आचरा.
पाणखोल जुवा बेट
बाजूलाच आणखीन एक बेट – त्याचे नावं बंडया आणि त्याला लागूनच तोंडवळीचा किनाराही दिसतो. मुख्य रस्त्याला लागून एका आडवळणाने अर्धा km गेले कि लांबूनच जुवा बेट दिसते. या बेटावर अगदी मोजकीच ३०-३२ घरे आहेत. बेटावरून कुठेही जायचे म्हटले कि होडीशिवाय पर्याय नाही.
येथे येणा-या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्य, नीरव शांतता, मोकळेपणा या ठिकाणी अनुभवता यावा, यासाठी ग्रामस्थांकडून येथे विशेष प्रयत्न केले जातात. पर्यटनस्थळाची व्याख्याच या ठिकाणी बदललेली आपणाला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. येथे केवळ भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतात. येथे येणा-या पर्यटकांना नौकाविहाराबरोबरच मासेमारी करण्याचा, खेकडे पकडण्याचा आनंदही घेता येतो. तसेच मलईदार शहाळी, नाष्टय़ासाठी घावणे आणि रस्सा, व अस्सल मालवणी जेवण आणि राहण्यासाठी झावळ्यांच्या सहाय्याने बनवलेली झोपडी अशा प्रकारच्या विविध सेवा येथे पुरवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी मिळत असल्यामुळे या बेटांवर पर्यटकांचा ओघ वाढत आहे.
बैरागी कासारटाका..मालवण
श्री भगवती देवी मंदिर, धामापूर.
१६ व्या शतकात इ. स. १५३० मध्ये विजयनगर साम्राज्याचे देशमुख नागेश देसाई यांनी धामापूर गावात एक विस्तीर्ण तलाव बांधला आणि त्या तलावाकाठी श्री भगवती देवीचे सुंदर देवालय उभारले. जवळच बत्तीस पायऱ्यांचा देखणा सुंदर घाट बांधला. १९५२ साली तलावावर कायमस्वरुपी बंधारा बांधला. सुमारे ४७५ वर्षाहूनही अधिक काळाचा इतिहास असलेल्या श्री देवी भगवती देवालयामुळे धामापूर हे गाव इतिहासात नोंदले गेले आहे. गावातील ग्रामस्थ व बंधा-याचे रक्षण ही देवीच करते, अशी भावना आहे.
ऐतिहासिक धामापूर तलाव.
श्री देवी भगवती संस्थान, कोटकामते
इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती.
श्री गजबादेवी मंदिर, तांबळडेग - मिठबांव गावचे श्रद्धास्थान
श्री सिद्धिविनायक मंदिर, देवगड
गिर्ये गावचा श्री देव रामेश्वर...देवगड
ग्रामदेवता श्री देवी भगवती मंदिर
सिंधुदुर्ग किल्ला
सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘
श्री. स्वामी ब्रह्मानंद गुहा (ओझर)
धबधब्याचा आवाज, तलावांतील माश्यांची चळवळं, गुहेची आर्त गुप्ततां, आसपासच्या वृक्षांच्या पर्णांचा ध्वनी, दगडांतील झर्यांमधून झिरपणारे पाणी, शुद्ध वातावरणं हे सर्व मन प्रसन्न करते. ओझरच्या गुहेबाबत एक घटना प्रसिद्धं आहे. आसपासच्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एकदां स्वामी ब्रह्मानंद त्या गुहेंतून आंत गेले असतां थेट सिंधुदुर्ग किल्ल्यावरं उमटले. या घटनेवरून पुरातत्वं खात्याने संशोधन देखील केले, परंतू गुहा अर्ध्यावरच बंद झालेली आढळली. हिच असावी त्या गुहेबाबतची गुप्ततां. काही जणांच्या मते हे ठिकाण पांडवकालीन आहे, तर काही जणांच्या मते हे ठिकाण शिवकालीन आहे.
ओझर एक प्रेक्षणीयं स्थळ आहे. गुहां, देऊळ, समाधी, तलावं व धबधबा असे सर्वचं एका ठिकाणी सापडल्यासं किती आनंद होतो, हे केवळं भेट देण्यार्यासंच कळेलं! म्हणुनच या स्थळास आयुष्या एकदातरी भेट द्यावीच!